12 वी च्या परीक्षेत बालगृहातील विद्यार्थ्यांचे यश

12 वी च्या परीक्षेत बालगृहातील विद्यार्थ्यांचे यश

चंद्रपूर :  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय व स्वयंसेवी बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके जसे अनाथ, बेवारस, परित्यागीत, हरवलेले, बालकांना बाल कल्याण समिती, चंद्रपूर यांचे आदेशान्वये दाखल करण्यात येते. सदर बालगृहात 0 ते 18 वर्षे  वयोगटातील प्रवेशित बालिकांना शासनाद्वारे निवास, पोषण आहार तसेच शैक्षणिक  सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. उपलब्ध संसाधनाचा

            जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अतंर्गत जिल्ह्यातील जिजामाता बालगृह, गडचांदुर येथिल 2 बालिका तसेच स्वामी विवेकानंद बालगृह राजुरा येथिल 2 बालकांनी कुठलेही ट्युशन न लावता 12 वी च्या परीक्षेत घवघवित यश संपादन केले आहे. या यशाकरिता बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲङ क्षमा बासरकर,  सदस्य वनीता घुमे, ॲड.अमृता वाघ, डॉ ज्योत्स्ना मोहितकर तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, कायदा व परिविक्षा अधिकारी सचिंद्र नाईक,  प्रिती उंदीरवाडे, व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा चाईल्ड लाईन, चंद्रपूर येथिल अधिकारी व कर्मचा-यांनी बालकांचे अभिनंदन केले.